Thursday, 25 August 2011

जन लोकपाल

भ्रष्टाचार कुणी करू नये?

तर मोठ्याने ओरडतात, सर्वांच उत्तर एकच - 'नेत्यांनी'

पण सुरुवात कोण करतो त्याचा थोडाही विचार आपण करीत नाही. आता आपण बोलतो पोलीस भ्रष्टाचार करतात त्यांना आडवा, आहो पण जर पोलिसांना तुम्हीच इमानदारिने वागून देता का? म्हणजे साधं उदहारण घ्या तुम्ही बाईक वर बिना हेलमेट ने जाताय किंवा लायसंस नाही किंवा साध्यात साध सिग्नल तोडलं आणि ट्राफिक पोलिसाने पकडल आणि पावती फाडायाला सांगितली तर आपणच चिरीमिरी देवून निघून जातो, म्हणजे आपणच याची सुरुवात करतो, आसेच साध्या साध्या गोष्टिंकडे लक्ष दिलं तर खरोखर देश  भ्रष्टाचार मुक्त होइल.

आन्ना  यांना मदत करायची असेल, खरोखर भारत  भ्रष्टाचार मुक्त   हवे असेल  तर सुरुवात   आपल्या पासून करा.

जय हिंद, जय  महाराष्ट्र,  जय   भारत

Tuesday, 17 May 2011

भारत

          पाकिस्तानने म्हटलंय की अमेरिकेने जसी लादेनवर कारवाई केली तसी भारताने पाकिस्तानात घुसून करू नये नाहीतर आम्ही भारतातील भरपूर ठिकाणे लक्ष केली आहेत. खर तर पाकिस्तानला ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट ती गर्वाने सांगतात.

                 पण खरं पाहिलं तर भारत तसं करूही शकत नाही, कारण कसाबने  जगासमोर अपराध करूनही त्याला अजून काही केले नाही तर ते पाकिस्तानात जाऊन काय करणार, भारताची शासन व्यवस्थाच तशी आहे.  अजुन ते कसाबबद्दल कय सिद्ध करतायेत ते देवाला माहिती. तेच जर कोण भारतीय असता आणि त्याने एकतरी अपराध केला असता तर त्याला एवाध्याला फासावर देऊन मोकले झाले असते. पाकिस्तानात जाउन जरी दाउद वैगरेना पकडल तरी त्याच्यावर केस चालविण्यात दाउदचं  आयुष्य संपून जाईल.
          
                 आतंकवादी हेच  कारण असल्यामुळे भारतात घुसतात. कारण त्यांना माहित आहे, आपण जरी सापडलो तरी केस पूर्ण होई पर्यंत मस्त मजा करता येइल आणि नंतर कोणीतरी येइल विमान, बस वैगरे हाइजैक करतील किंवा परत होटेल मध्ये घुसून लोकांना वेठीस धरून आपल्याला सोडवतिल.